मी जितेंद्र विजय जाधव (प्रा.शिक्षक) प्रथमतः आपले शेवाळी गावाच्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आपण समाजाचे काही देणे लागत असतो आपण समाजात राहतो , वावरतो , म्हणून प्रत्येक जण आपापल्या पध्द्तीने काही ना काही समाजासाठी काही तरी करतो म्हणून मला हि वाटले कि आपण हि काही तरी वेगळे करावे मी हि या मध्ये सहकार्य करावे असे वाटत होते परंतु काय करावे कि आपणही या समाजाला सहकार्य करण्या मध्ये खारीचा वाटा उचलू शकू . बऱ्याच प्रयत्ना नंतर मला एक युक्ती सुचली कि आपण गावातील सर्व लोंकाना एकत्र आणू शकतो , कारण बहुतेक तरुणांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत , मोबाईल च्या माध्यमातून आपण त्यांना एकत्र आणू शकतो म्हणून मी एक ग्रुप बनविला " शेवाळी लयभारी" या ग्रुप मधून मी आपल्या गावातील विदेशात असणारे , उच्च पदावर असणारे , तसेच इतर क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला , परंतु तो प्रयत्न काही खास जमला नाही म्हणून वेगळा मार्ग काढावा असे वाटले.
म्हणून त्याच माध्यमातून म्हणजे मोबाईल द्वारेच काहीतरी वेगळे करावे असे वाटले व मी माझ्या क्षेत्रात जशी सर्व शालेय माहिती एका वेबसाईड वर बनवली आहे तसेच आपण हि ते आपल्या गावासाठी करू शकतो. व मी एक ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्या ब्लॉग चे नाव आहे "" शेवाळी""
या ब्लॉग साठी गावातील अनेकांनी मला मदत केली त्या मध्ये , ब्लॉग साठी लागणारे फोटो मला चंद्रकांत संजय जाधव , फोटो वरील डिजाईन साठी माझे मित्र श्री. मनोज पाटील ( प्रा.शिक्षक कल्याण) , गावाच्या इतिहासासाठी श्री. किरण नांद्रे तसेच इतर माहिती साठी श्री. जितेंद्र विलास साळुंके या लोकांनी मला ब्लॉग तयार करण्यासाठी मदत केली त्यांचे मी ऋणी राहीन.
याआपणास काही माहिती द्यावयाची असल्यास काही सूचना असल्यास सांगाव्यात मी आपला बदल स्वागतहर्ता स्विकारेन